Jan 10, 2024


 

Jan 2, 2024

हारा वही जो लढा नहीं !

चंबळ - गुन्हेगारी, राजकारण, भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा खालवलेला दर्जा या साठीच कुप्रसिद्ध असलेला देशाचा एक भाग. या भागात आत्मसान्मानान जगणं म्हणजे व्यवस्थेविरोधात उभं राहणं. मनोजचे वडील तेच करतात परिस्थिती हालाखीची असतानाही भ्रष्टाचाराला विरोध करतात आणि विधायकजींची नाराजगी ओढवून घेतात. त्यांना सरकारी नोकरीतून सस्पेंड केलं जातं. ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शहरात निघून जातात. इकडे मनोज बारावी पास करून कुठली तरी छोटी मोठी नौकरी करण्याचे स्वप्न पाहत असतो. विधायकजींच्या कॉलेजमध्ये वर्षानुवर्षे कॉपीच्या जोरावर मुलं दहावी बारावी होत असतात, मनोजची सुद्धा पूर्ण तय्यारी झालेली असते पण नेमक्या त्याच वेळी डीएसपी अधिकारी परीक्षा सेंटरवर धाड टाकतात... आणि चीटिंगच्या भरोश्यावर असलेले मनोजसह सर्व विध्यार्थी बारावी परीक्षेत फेल होतात.

विधायकजी डीएसपी दुष्यन्त साहेबांना गुंडाळण्याचा भरपूर प्रयन्त करतात पण दुष्यन्त सर त्यांच्या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. इकडे बारावी फेल चा शिक्का बसल्यावर मनोज भावासोबत रिक्शा जुगाड चालवू लागतो, पण त्याचा थोडाफार फटका विधायकजींच्या खाजगी वाहतूक व्यवस्थेला बसतो म्हणून त्यांचे जुगाड जप्त करून या दोघांना लॉकअपमध्ये टाकले जाते. इथे डीएसपी दुष्यन्त मनोजला सोडायला सांगतात... मनोज दुष्यन्त सरांच्या वागण्याने आणि पदाच्या पावरनें प्रभावित होतो आणि 'मलाही तुमच्यासारखं डीएसपी व्हायचंय त्यासाठी काय करावं लागेल? ' असा प्रश्न करतो तेंव्हा दुष्यन्त सर त्याला 'फक्त परीक्षेत कॉपी करू नकोस' असा मिश्किल सल्ला देतात. मनोज तो सल्ला मनावर घेतो.... पुढच्यावर्षी फक्त अभ्यासाच्या जोरावर चीटिंग न करता सेकंड क्लासमध्ये पास होतो आणि डी एस पी होण्यासाठी आजीने दिलेल्या पैश्याच्या मदतीने शहर गाठतो परंतु शहरात पाऊल ठेवण्याआधीच पैशांसह त्याची ब्याग पळवली जाती, इकडे डीएसपी परीक्षेसाठी काहीतरी निर्णय येतो आणि हा अभ्यासक्रम रद्द होतो पुन्हा त्याचा संघर्ष सुरु होतो... तीन दिवस उपाशीपोटी काढल्यावर त्याला पांडे भेटतो. तो, आय पी एस च्या तय्यारी साठी दिल्लीला जाणार असतो. मनोज त्याला त्याच्यासाठीही दिल्ली तिकिटासाठी विनंती करतो आणि त्यालाही आय पी एस बनायचंय असं सांगतो. पांडे त्याचा अवतार पाहुन हसतो पण त्याच्या डोळ्यातली चमक आणि परिस्तिथी पाहुन त्याला मदत करतो आणि दिल्लीला घेऊन येतो. 

 मनोज दिल्लीत येतो, दोन दिवस पांडेकडे राहतो नंतर स्वतःसाठी काम शोधतो.... पुढे दोघांनाही त्याचा स्वतःच शेवटचा अटेम्ट देणारा गुरु गौरीनंदन भेटतो ... मनोज अतिशय मेहनतीनं प्रिलीम पास होतो... पुढे त्याला श्रद्धा भेटते .... मनोज मेन एक्साम फेल होतो... आणि मग पुन्हा रिस्टार्ट...! 15 तास काम... रात्री अभ्यास आणि पुन्हा एक्साम्स ... पुन्हा प्रिलीम्स पुन्हा मेन्स... आणि शेवटी शेवटचा अटेम्ट! 

 मधल्या काळात बरंच काही घडतं... श्रद्धा - मनोज... मनोजचा मित्र पांडे... गौरीनंदन ... मनोजचे वेगवेगळे गुरु आणि बरंच काही. 

 पुढे मनोजच काय होतं श्रद्धाच काय होतं आणि दोघांच्या नात्याचं काय होतं हे पाहण्यासाठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे, तुम्ही पहा तुमच्या मुलांना दाखवा... चित्रपट सुंदर आहे थियटरला किती चालला माहित नाही पण ओटीटी वर रेकॉर्ड ब्रेक करतो आहे! चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे ... यापूर्वी यावर एक कादंबरी ही याच नावाने येऊन गेली ती अनुराग पाठक यांनी लिहिली आहे.. त्यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी हा सर्वांग सुंदर आणि प्रेरणादायी चित्रपट बनवला आहे..!

सर्वच कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केला आहे, मुख्य भूमिकेत असणारा विक्रांत मेस्सी आणि श्रद्धा, गौरीनंदन आणि पांडे यांच्या भूमिका करणारे कलाकार विशेष लक्षात राहतात. 

 चित्रपट पाहताना कितीतरी वेळेस डोळे भरून आले... Mpse, upse ची तय्यारी करणाऱ्या कितीतरी मित्रांचे चेहरे आणि भविष्य डोळ्यासमोरून गेलं ! 

 रियल लाईफ मधील मनोज आणि श्रद्धा यांचे बरेच interview youtube वर आहेत तेही पाहण्यासारखे आहेत... Apb maza वर माझा कट्टा मधील मुलाखत आहे त्यात दोघे ही खूप सुंदर मराठी बोलतात ऐकून हेवा वाटतो ! सोबत रिल लाईफ आणि रियल लाईफ चा एकत्र फोटो आहे पहा म्हणजे लक्षात येईल की, बाओपिक बनवताना अभिनयासोबत कलाकारांचं दिसणं सुद्धा किती महत्वाचं असतं. कलाकाराच्या निवडीबाबतही एक interview youtube वर आहे ! 

 चित्रपट : 12th FALE 
 दिग्दर्शन : विधू विनोद चोप्रा 
 कलाकार : विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, अनंत जोशी, अंशुमन पुष्कर 
 IMDb reting : 9.2/10 

#12thpass 
#restart


Dec 15, 2023

असामान्य बुद्धिमत्तेचा असामान्य संघर्ष

एखादा माणूस सज्जन असेल, कृतत्ववान असेल तर त्याचं भविष्य उज्वलच असेल यात शंका नाही त्याहीपुढे जाऊन तो निस्वार्थी, देशाभिमानी, देशभक्त आणि देशासाठी झुंजणारा असेल तर, देश त्याला डोक्यावर घेऊन नाचेल, देशाला त्याचा अभिमान असेल... असच ना ! मलाही असंच वाटतं, असंच असायला हवं आणि बहुतांशवेळी असंच असतं ही... पण एखाद्या अश्याच असामान्य कृतत्ववान आणि देशभक्ताच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं होत असतं... जनू देशच त्याच्या देशभक्तीवर सूड उगवत असतो, आणि माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला मात्र याचा थांगपत्ताही नसतो त्याला दिसतो फक्त चंद्रावर पोचलेला देश... आणि पुन्हा एक चुनावी जुमला ! रॉकेट्री - दी नम्बी इफेक्ट, इसरोचे वैज्ञानिक नम्बी नारायणन यांच्या असाधारण जीवन संघर्षावर आधारित एक सर्वांग सुंदर सिनेमा. काल हा सिनेमा पाहण्यात आला आणि एका अतिशय बुद्धिमान चलाख शास्त्रज्ञान्याच्या खडतर संघर्षाची जीवनकथा, आर. माधवन यांचा सर्वांगसुंदर अभिनय, संघर्ष आणि हतबलता क्षणोक्षणी आपले डोळे ओले करतात. फ्रान्स, अमेरिका आणि रशिया या रॉकेट सायन्स मध्ये अव्वल असणाऱ्या देशांची मुजोरी आणि अडवणूक यांना तोंड देत देत त्यांच्याच मदतीने त्यांना धूळ चारत त्याच्या पेक्षा कितीतरी कमी किमतीत आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट कार्यक्षमता असलेले क्रॉनिक इंजिन आणि टेक्नॉलॉगी आपल्या भारतीय सहकार्यांच्या सोबत बनवणाऱ्या या शास्त्रज्ञाचा हा प्रवास थक्क करणारा आणि तितकाच धक्कादायक आहे. जेंव्हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या शस्त्रज्ञावर देशद्रोहाचा आरोप करून त्याच्या कबुली जवाबासाठी त्याचा अमानवी छळ केला जातो. दुसरीकडे वर्तमाणपत्रे आणि टीव्ही वरील सवंग पत्रकारितेवर विश्वास ठेऊन समाज त्याच्या कुटुंबालाही अतोनात छळतो. तपासादरम्यान एक सीबीआय अधि
कारी विचारतो की,' तुमच्यावर एवढे गंभीर आरोप लावले असताना आणि तुम्ही देशासाठी पोलीस कस्टडीत असताना तुमचा एकही सहकारी शास्त्रज्ञ तुम्हाला भेटायला का आला नाही?' यावर नम्बी नारायणन यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, 'जब कोई रॉकेट तुटता है तो हमारे सायंटिस्ट अपसेट होते है लेकिन कोई आदमी तुटता है तो उन्हे कुछ नही लगता!' शाहरुख खान यांनी शाहरुख खान म्हणून ऐका टी.व्ही. चॅनेल साठी घेतलेल्या मुलाखतीतून फ्लॅशबॅक च्या माध्यमातून हा सिनेमा उलगडत जातो आणि या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या शास्त्रज्ञावर देशद्रोहाचे आरोप ठेऊन आपण त्याच्या उम्मेदीचे 20 वर्ष फक्त आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी वाया घालवायला लावतो आणि सरतेशेवटी त्याला पद्मभूषण देऊन गौरवतो....! देशात कधी काळी हे सगळं घडून गेलेलं असतं आणि आपल्याला मात्र काल परवा पर्यंत ही माहीतही नसतं ही केवढी मोठी शोकांतिका आहे ! देशद्रोहाचे हे आरोप लावण्यामागे काय कारस्थान होतं हे आरोप कोणी आणि का लावले या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा देत नाही, कारण वास्तवातही या प्रश्नांची उत्तर मिळालेली नसावी असं वाटतं. चित्रपटात विकास इंजिन बनवण्यासाठीचा शास्त्रज्ञानचा प्रवास, इतर देशांनी केलेली अडवणूक आणि भारतीय टीमची बुद्धिमत्ता याचा रंजक प्रवास या चित्रपट मांडलेला आहे तो प्रत्येक्ष पाहणं रोमांचक आहे. चित्रपट 2022 ला प्रदर्शित झालेला आहे, जिओ सिनेमावर उपलब्ध आहे नक्की पहा ! - रमेश ठोंबरे #rocketry