Jun 2, 2009

दिवस तो उजाड़ता (३० सप्टेम्बर १९९३)

दिवस तो उजाड़ता रात्र का हो झाली,
मूल, बाळ संसारही रस्त्यावर आली.
रात्र सारी आश्रुनी न्हाहुनी हो गेली,
म्हणे एक कवी, 'उष:काल होता होता काळरात्र झाली'
हादरली जमीन सर्व हालले सामान,
मृत्यु नेही तेथे तेंव्हा घातले थैमान.
कोसळले घर म्हणे झाला हो भूकंप,
जीवनाचा कित्तेकांच्या तेथे झाला की हो संप.
नाही ऐकू आली राम-प्रहरी भूपाळी,
भूकंप म्हणोनी कोणी ठोकली आरोळी.
मातेनच दिली लेकराना ललकारी,
उध्वस्त झाली तेंव्हा तेथे ती किल्लारी.
तिस सप्टेम्बर काळा दिवस ठरला,
नाही म्हणता-म्हणता सर्व महाराष्ट्र हालला.
रुद्रावतार असा कसा धरणी मातेचा ?
जीव घेतला त्यान हजारो लेकरांचा.
भूकंप - भूकंप म्हणता कोसळले घर,
रडा-रडीतच झाला सकाळचा प्रहर.

- रमेश ठोम्बरे Ramesh Thombre
दि. २/१०/१९९३
(कवितेला लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची पार्श्वभूमी आहे.
तेंव्हा मी ११ वीत धारुर जिल्ला बीड येथे शिकत होतो )