Sep 17, 2014

* भूतकाळी राजकारणातून ….

लहानपणी शाळेत जावून पाटीवर 'अ' गिरवायच्या दिवसांत, त्यानं म्हशीच्या पाटीशी सलगी केली, तरुणपणात आडल्या नडलेल्यासाठी अंगमेहनत करून  'नारायणाची' भूमिका वठवली … पुढं पक्ष कार्यकर्त्याच्या माध्यमातून नारायणाचा  'नारायणराव' झाला,  सहकाराला हाताशी धरून अक्खा जिल्ला पिंजून काढला, जनसंपर्क आणि ओठावरच्या साखरेनं त्याला एकदिवस 'साखर सम्राट केलं'. पुढं याच आडणी डोक्यानं समाजकारण आणि राजकारणाच समीकरण असं फिट्ट केलं कि, 'काला अक्षर भैस बराबर' वाला हा नेता शिक्षण सम्राट झाला. आई बापाच्या नावानं शिक्षण संस्था काढल्या, जील्यातले शिकले सवरलेले पोरं मास्तर म्हणून चिकटवले. म्हशी मागचे पोरं फावल्या वेळत साळत जावू लागले. या समाजकारणा सोबत कारखान्दारीच राजकारण होतच, गडी आता 'अवजड' नेता झाला.  कधी काळी 'पोरवयात हे धूड म्हशीवर बसून गावभर फिरायचं' असं कुणी जुन्या खोडांन सांगितलं तर आजचे तरणे पोरं 'खोडाकड' सौन्श्यान बघायचे अन निघून जायचे.

तर सांगायचा मुद्दा हा कि, या नेत्याचं जील्याच्या राजकारणात 'दोन्ही अंगानं वजन व्हतं', निवडणुकांच्या काळात यांच्या सभांनी आणि भाषणांनी जिल्ला ढवळून निघायचा, लोकं सभेला गर्दी करायचे, भाषण ऐकण्यासाठी लोकं अर्धा-अर्धा तास आधीच हजर असायचे, 'पिंजारलेल्या झुबकेदार मिशांमधून वळण घेत, वाट काढत, शब्द लोकांच्या कानावर आदळत, तेंव्हा पहिले पंधरा मिनिट तर त्या उच्चारांच्या वेगाशी आणि शब्दफेकिशी जुळवून घेण्यातच कानाची वाट लागायची. पुढं केंव्हातरी शब्दांची आणि कानाची वेवलेन्थ जुळायची म्हणे. (भरगच्च थेटरात दादा कोंडकेंचा पिच्चर पहिल्यांदाच पाहताना म्हणजे ऐकताना मला असा अनुभव आला होता)  निवडणुकांच्या दिवसांत रात्रीतून बाजी पटतवून टाकण्याच्या यांच्या खेळाला पुढं लोक 'हाबडा' म्हणून ओळखू लागले. बरीचं वर्षं अश्या 'हाबाड्याचा' धास्तीवजा अनुभव जिल्यातील भल्या भल्या स्त्री-पुरुष नेते मंडळीन घेतला.          

पण आता दिवस बदलले, वयोमान आणि आकारमानाचा विचार करता एक एक इंच भूमी लढवण्यासाठी स्वतः यांनाच हाबाड्याची गरज पडते, साखर सम्राटाला 'साखर्या रोग' झाला, या शिक्षण सम्राटाला पूर्वी अक्षर वाचता तर येत नव्हतं पण ते निदान दिसायचं, आता अक्षर दिसत हि नाही, 'गडी'वर विसावलेलं हे धूड आज कित्तेक वर्षांपासून टाकल्या जाग्यावर पडून आहे, कूस बदलायची तर दोन आडदांडांची मदत घ्यावी लागते. सर्वांगाला खाज सुटलेली आहे, दिवसभर जमंल तसं आणि जमंल तिथं खाजवणं हा राष्ट्रीय कार्यक्रम (त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, सहकारी कार्यक्रम) चाललेला असतो.  त्यासाठी दोन स्पेशल माणसं  २४ x ७  या हिशोबान ठेवलेली आहेत. पूर्वीच्या शस्त्रधार्यासारखे ते  हातात तुराट्याचा झाडू घेवून हजरच असत्यात, हिकडं खाजव, तिकडं खाजव, चालुंदे तेच्या मारी ! 

Sep 5, 2014

शर्यत

  
 .
तू शर्यत लावायचास ….
अन रिचवत जायचास पेल्या मागून पेले,
त्याच सोबत तू रिचवायचास,
तुझ्या आतले कितीतरी दु:खं
तुझ्याही नकळत.
.
.
.
आता मला चांगलंच अंगवळणी पडलंय
तुझं हे शर्यत लावत जाणं,
अन हरल्या मनानं
असं दु:खांला जिंकून घेणं


- रमेश ठोंबरे