आज मराठी मध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जाते आहे, इतक्या
संख्येने मराठी मध्ये या पूर्वी कविता लिहिली गेली असेल असे वाटत नाही.
त्याच वेळी दर्जेदार कविता मात्र लिहिली जात नाही असे जाणवते आहे. कायम
मनावर कोरल्या जातील अश्या फारच कविता आज वाचनात येतात. पूर्वीच्या काळी
छपाई माध्यमे नसतानाही त्या काळच्या अनेक रचना आज जिवंत आहेत ...
पुन्नरर्जीवीत होत आहेत. मग नवीन लेखन
तितक्याच ताकतीने का समोर येताना दिसत नाही ? का आपण सर्वचजन
गुणवत्तेपेक्षा संखेच्या मागे लागलो आहोत ? आपल्याला गुणवत्तेच नोबेल हव
आहे कि संख्येच !
इंग्लिश कथा / कविता लोक रांगा लाऊन विकत घेतात आणि
आपल्याकडे मराठी कवितेला प्रकाशक सुद्धा कुठल्याच रांगेत उभं करत नाही ....
हा काय त्याचा दोष आहे ? हा आपल्या लेखनाचा दोष नाही का ...? हा आपल्या
लेखनाचा दर्जा नाही का ? मराठी कवी / लेखक स्वतःच्या खर्चाने पुस्तक
छापतो ... स्वताच्या खर्चाने मोफत वाटप करतो तरीहि त्याची पुस्तकं वाचली
जात नाहीत... त्याची कविता, त्याचं गाणं इतर ठिकाणी वाचनात / एकण्यात येत
नाही ! हा काय वाचकांचा दोष आहे ? तुम्ही मुक्त छंदाच्या नावाखाली धडे
लिहिणार .... छंदाच्या नवाखाली यमकांशी खेळणार ... आणि वृत्तबद्धतेच्या
नावाखाली शब्द जोडणार असाल तर तुमच्या / आमच्या भावना वाचकानपर्यंत कशा
पोचणार ? आणि वाचक त्यांना काय म्हणून वाचणार ?
प्रश्न बरेच आहेत .... उत्तर फक्त एकच ... दर्जा सुधारला गेला पाहिजे
माझा एक समीक्षक मित्र आहे तो मागे खूप दिवसांपूर्वी ओर्कुट वाचक म्हणून
होता ... वाचनाची आवड असल्याने तो वाचनात आलेल्या कवितेवर लिहू लागला....
त्याला कवितेची जाण होती त्यामुळे त्याला आजच्या कवितेतील बर्यचा गोष्टी
खटकत होत्या ... त्या तो नमूद करत होता ... त्याला आवडणाऱ्या / नआवडणार्य
रचनांबद्दल तो लिहित असे .... अर्थात जास्त रचना या नआवडणाऱ्या ... काव्य
नसणाऱ्या असत. याच समीक्षक मित्राशी चर्चा करताना एक मुद्धा समोर आला ..
कि आज 'ब' दर्जाची कविताच जास्तीत जास्त लिहिली जाते ...(तो : 'ब' दर्जाचे
कवी जास्त आहेत असे बोलला होता) ('अ' दर्जा म्हणजे आतून आलेली original
कविता आणि 'ब' दर्जाची कविता म्हणजे प्रेरित होऊन, विषयावरून, शब्दावरून
... मागणीवरून लिहिलेली कविता असे त्याचे मत.) काहीतरी लिहायचं म्हणून
कविता लिहिली जाते ... ती आतून आलेली नसते .... त्या कवितेत अर्थ नसतो ...
अर्थ असला तर त्या अर्थाला काव्याच्या शेडस नसतात वगेरे वगेरे.
आज हा
मित्र ओर्कुट किंवा थोपू वर वाचत नाही / लिहित नाही कारण त्याचा अपेक्षाभंग
होतो ... दर्जा सुधारत नाही ... दाखवलेल्या उणीवा सुधारणे तर दूरच पण
लोकांना ते रुचतहि नाही ... आणि दर्जाहीन लेखनाला छान म्हणणे याला पटत नाही
!
तुम्ही काय करता ...? वाचनात आलेल्या आणि नआवडलेल्या रचनेला
छान म्हणता ..../ आवडली नाही म्हणून सांगता / उणीवा दाखवता / कि तटस्थ
राहता ..... ?
तुमची प्रतिक्रिया काहीहि असो ... ती प्रामाणिक असली
पाहिजे... उणीवा असतील तर त्या दाखवल्या पाहिजेत. मराठी कवितेचा दर्जा
वाढवण्यासाठी आपल्यातील वाचकांना आणि साहित्यिकांना समीक्षक मित्रांची
भूमिका कठोरतेने पार पडावी लागणार आहे, आणि लेखक / कवी मित्रांना आपल्या
कवितेवरील प्रतिक्रियेचा विचार कवितेचा दर्जा सुधारण्यासाठी करावा लागणार
आहे !
यावर अनेक लोकांची अनेक मते असतील ...
कोणी म्हणेल "कोण म्हणतो कवितेचा दर्जा घसरलेला आहे ?"
कोणी म्हणेल "मी वाचकांसाठी कविता लिहितो ती त्यांना आवडते"
कोणी म्हणेल "मी माझ्यासाठी कविता लिहितो .... मला त्याचे काय ?"
"मी आतून आल्याशिवाय कविता लिहित नाही ..."
"मी ठरवून कविता लिहितो ... हव्या त्या विषयावर लिहू शकतो "
अनेक प्रश्न आहेत .... उत्तर कदाचित मिळणार नाहीत ... पण प्रयत्न जरुर करूयात ...
बोला तुम्हाला काय वाटते .....?
कशी आहे आणि कशी असावी मराठी कविता ?