Feb 22, 2012

तेंव्हा मला चीड येते


असत्य सत्यावर विजय मिळवत,
आणि हिंसा अहिंसेच्या मानगुटीवर बसते ... ...
एक एका आदर्शाची पायमल्ली होते ...
तेंव्हा मला चीड येते.
.
.
काळ्या मातीसाठी शेतकरी जीवाचं रान करतो ...
वरुण राजाच्या आगमनाची ....
बळीराजा चातकासारखी वाट पाहतो ....
अन राजा मुरलेल्या राजकारण्यासारखा वागतो ....
बळीराजाशी वरुणराजा राजकारण खेळतो ....
पाणी हवं तेंव्हा तोंड काळ करतो ...
अन नको तेंव्हा भोकाड पसरतो
तेंव्हा मला चीड येते.
.
.
कोणी तरी गाव गुंड ...
सुतकी कापडं घालतो ...
सुतकी चेह्रेयावर कावेबाज हसू पेरतो ...
जनतेचा विश्वास संपादन करून ...
उभ्या आयुश्यावर गोमुत्र शिंपडतो ...
हिरव्या गांधी नोटांची बरसात करतो ...
आणि तुमच्या आमच्या साक्षीने,
पाच वर्षासाठी पुन्हा ... देश विकत घेतो ..
तेंव्हा मला चीड येते.
.
.
हजार वेळा निषेद केला जातो ...
हजारदा वीर-चक्र प्रदान केले जातात ...
हजोरोंचे बळी घेणारे हात ...
कायद्यापासून मोकळे सुटतात ...
साक्ष, खरं, खोटं पुन्हा पुन्हा ...
गाढलेले मढे उकरले जातात ...
ज्यांच्या बळावर खटला ...
वर्ष ... दोन वर्षे ... दहा वर्षे ...
वर्षा मागून वर्षे चालवले जातात ....
जनतेच्या पैश्यावर अतिरेकी पोसले जातात,
आणि पुन्हा त्यांना सोडण्याची वेळ येते ....
तेंव्हा मला चीड येते.
.
.
.
सर्वांगीण विकासासाठी बाप मुलाला शाळेत घालतो ...
स्वतः रोजंदारी करून कुटुंब पोसतो ...
लेकराची शाळा दुरून पाहतो ...
तेंव्हा ... स्वप्नात हरवतो ...
लेक साहेब आणि स्वतः साहेबाचा बाप बनतो ...
लेक शिकला सार्थक झाले असे वाटण्याचे दिवस ...
पण लेकाच्या हातातील पुंगळीची,
शिक्षणाच्या बाजारात विक्री केली जाते ... ?
तेव्हा मला चीड येते.
.
.
समाजात काही तरी ...
समाजविरोधी घडत ...
समाजसुधारक ... जनतेचे कैवारी ...
महिला जाग्रुती ... नारी संगठना ...
कामगार नेते ...
सर्व स्थरातून निषेध नोंदवले जातात ...
वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जातात ...
चौका-चौकात मोर्चे निघतात,
पुतळे जाळले जातात ...
तेंव्हा मला चीड येते.
.
.
तेंव्हा मला चीड येते.
.
.
आणि
.
.
आणि जेंव्हा जेंव्हा मला चीड येते ..
तेंव्हा मी सत्याग्रह करतो ...
निषेद करतो ...
आवाज उठवतो ...
एक कविता करतो !
वांझोटी कविता .... !

आणि पुन्हा मला चीड येते
माझ्याच वांझोट्या कवितेची
आणि नपुंसक कवित्वाची !
.
.
- रमेश ठोंबरे
Mob. : 9823195889

No comments:

Post a Comment