Jan 5, 2015

छंदमुक्त !

 छंदमुक्त !

लिहिण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीनुसार वाचकांच्या आणि वर्गीकरणाच्या सोयीसाठी म्हणून साहित्यात गद्य आणि पद्य विभाग आले, त्यानंतर गद्य साहित्य आणि पद्य साहित्य असे वर्गीकरण करण्याची सोय झाली. नंतर पद्यामध्ये असेच 'मुक्त' आणि 'छंद / वृत्त' असे वर्गीकरण झाले इथपर्यंत सगळंच आलबेल होतं.

कवितेमध्ये जेंव्हा  'मुक्त' आणि 'छंद / वृत्त' असं वर्गीकरण झालं तेंव्हा मुक्त लिहिताना, मुक्तपणाचे आणि वृत्त किंव्हा छंद लिहिताना त्यातील बंधनाचे नियम पाळले जावेत असं काहीसं ठरलं असावं. मग ज्यांना मुक्त जमतं त्यांनी मुक्त लिहावं ज्यांना छंद आवडतो त्यांनी तो अचूक लिहावा एवढी अपेक्षा असणं गैर आहे काय ?

मग छंद किंवा वृतात लिहिताना, "मी अर्थाला 'जास्त' महत्व देतो, मला 'शब्द खेळ' नको असतो" अश्या सबबी देवून 'छंद मुक्त' लिहिण्याचा अट्टाहास कशासाठी ? त्यासाठी तितक्याच ताकदीचा मुक्तछंद आहे की.  वृतामध्ये लिहिण्याचा प्रयत्न हि न करता, तेवढी मेहनत न घेताच  "वृतात्मध्ये अर्थाला महत्व नसत, छंदात लिहिणे म्हणजे नुस्ता शब्दखेळ असतो"  असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय ?

जमत नाही तर तिकडं जावू नका, गेलात तर बंधनं पाळा, आणि खरच तुमचं 'छंदमुक्त' (मुक्त नव्हे, छंद आणि मुक्त च्या मधलं - छंदमुक्त !)   लिहिणं इतकंच अर्थपूर्ण असेल तर तेच छंदात लिहा, लिहिताना  'अर्थ' आणि 'वृत्त' याचं आव्हान स्वीकारा !    सोप्प्प आहे, नाही का ?

No comments:

Post a Comment