May 16, 2018

माणसे वेल्हाळ होता तो

वाचकांची नाळ होता तो
पुस्तकांची चाळ होता तो

ऐकण्याचा कान ही झाला
बोलणारा टाळ होता तो

दोष कोणा द्यायचा नाही
पांढरे आभाळ होता तो

कोपराने खोदला आम्ही
अन म्हणे, खडकाळ होता तो !

आठवांणी कंठ भरल्यावर
रम्य सायंकाळ होता तो

माणसांनी टाकले त्याला
माणसे वेल्हाळ होता तो

थांबला पण काळ आल्याने
कर्दनांचा काळ होता तो

शेवटाला बाळ ही झाला
माउलीचे भाळ होता तो

- रमेश ठोंबरे
----------------------------------------------------------
आम्हा सर्व कविमित्रांचे मित्र आणि मार्गदर्शक,
गोष्टीवेल्हाळ स्व. सुधाकर कुलकर्णी अर्थात
सु.ल. यांना विनम्र आदरांजली !
----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment