Apr 11, 2018

एक प्रश्न (1)

कापूस पिकवणाऱ्या
शेतकऱ्याच्या बायकोच्या
अंगावर नवं कापड दिसल्याशिवाय,

ऊस पिकवणाऱ्या
शेतकऱ्याला सकाळच्या चहात
समाधानाची गोडी जाणवल्याशिवाय,

गहू ज्वारी पिकवणाऱ्या
शेतकऱ्याच्या चुलीवरची भाकरी
अभिमानानं टम्म फुगून आल्याशिवाय,

अन
वर्षानु वर्ष काळ्या आईची
ओटी भरणाऱ्या
शेतकऱ्याची पोर
कोऱ्या सातबाऱ्यात सह
आत्मिक समृद्धीत
उजवून निघाल्याशिवाय,

हा कृषिप्रधान देश
सुजलाम सुफलाम झालाय
असं कसं म्हणताय येईल ?

- रमेश ठोंबरे
#प्रश्न_पहिला

No comments:

Post a Comment