Dec 12, 2011

36 || शेवटचा अभंग ||


शेवटचा अभंग
प्रियेच्या चरणी
म्हणतील ज्ञानी
असे का हो ? || १ ||

जिच्या साठी केला
आहे हा प्रवास
तिचा तो अभ्यास
घेत आहे || २ ||

शृंगाराच्या पुढे
अस्तो एक रस
परी तो हव्यास
इथे नाही || ३ ||

सुटतील बंध
जेव्हा योवनाचे
पडदे लाजेचे
पडलेले || ४ ||

समजून घ्यावी
भावना मतीची
वेळ ती रतीची
आज आहे || ५ ||

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment