Nov 3, 2011

जंगलच कविसंमेलन





जंगलात एकदा कविसंमेलन झालं
उंटाला त्याचा अध्यक्ष केलं.
कवी संमेलनाला कवीच फार,
रसिकांची होती मारा-मार.
एकदाचे संमेलन सुरु झाले

निवेदकांनी निवेदन केले.
निवेदन आता संपल्यावर..
गाढवाला मिळाला पहिला मान.
संधी मिळताच वही उघडून,
गाढवाने लांब मारली तान.
नंतर नंबर आला उंदराचा,
त्यानं कानोसा घेउन मांजराचा...
रसिकांना सांगितलं थोडंसं हसा,
रसिक म्हणाले, 'तुम्ही आधी टेबलावर बसा.'
नंतर उंदीर टेबलावर आला, 
अन मांजर दिसताच पळून गेला.
नंतर आली वाघाची मावशी,
ती तर निघाली फारच हौशी.
एकामागून एक, तिनं कविता म्हणल्या चार,
तेव्हा संयोजक लांडगे, वैतागून म्हणाले,
"बाकीच्यांचा हि करा विचार.
मांजर मग फार रागावली...
अपमानान गुरगुरत निघून गेली.
आत्ता फुलउन सुंदर पिसारा..,
व्यासपीठावर आला मोर.
कवितेसोबत नृत्य करून त्यानं ...
श्रोत्यांना केलं डबल बोर.
नाव न पुकारताच आला जंगलचा राजा,
पाहून हत्तीनं वाजवला बाजा.
मग उंदीर थोडा सावध झाला.
ससा तर जंगलात पळून गेला.
सिह रागात म्हणाला, येवढं मोठं संमेलन झालं,
तरी लबाड लांडग्यान, मला आमंत्रण नाही दिलं.
आता उडी घेतली सिंहांन डरकाळी फोडून,
आणि खाली आला सरळ व्यासपीट मोडून.
सिंहांन कविता म्हणली टेबलाजवळ जावूंन
अन निकाल न ऐकताच गेला पुरस्कार घेवूंन.

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

No comments:

Post a Comment