Jul 14, 2011

शोकांतिका


आपण वर्तमानात जगतो,
भूतकाळ फार लवकर विसरतो
कारण, रोजच नवीन विचार... रोजच नवीन वाद आहे !
कधी मुंबई, कधी दिल्ली तर कधी हैदराबाद आहे !

रोज नवा दहाशतवाद, रोज नवीन बळी आहेत
पुन्हा तीच गोळी अन मानवतेची होळी आहे !
शहिदांच्या पार्थिवावर वीरचक्र अर्पण केले जातात,
त्यांच्या विधवांना आश्वासने दिली जातात,
मिडिया समोर ढोल बडवले जातात,
अन वर्तमानपत्रांचे रकाने भरले जातात ...

कोण अफजल गुरु, कोण अजमल कसाब....?
कोण होते दहाशतवादी कोणाला विचारणार जाब !

कोण हेमंत करकरे, अन कोण विजय साळसकर ?
कितीदिवस आठवतील ह्या शहिदांची नावं..
अन आठवली तरी, बनून राहतील फक्त नावच...
२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यातील !

दर वर्षी दर दिवस घेतल्या जातील शोकसभा,
जळणाऱ्या मेनबत्त्यानाच फक्त अश्रू ढाळण्याची मुभा ?

काल झालेली हि एकांकिका नव्हती !
तीन-चार दिवस चाललेली Live commentary तर नव्हतीच नव्हती !
हि होती शोकांतिका लोकशाहीची, देश्याच्या राजकारणाची !

आपण या शोकांतिकेचे नेहमीच प्रेक्षक ठरणार आहात ..!
सांगा, हि थांबवण्यासाठी आपण काय करणार आहात ?

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment